जालना- जालना शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागाच्या वतीने सन 1982 -83 मध्ये इंदेवाडी परिसरात एक जलकुंभ बांधण्यात आले होते. 22 लक्ष 50 हजार लिटर पाणी साठवण्याची या जलकुंभाची क्षमता होती .हे जलकुंभ आता जीर्ण झाल्याचे जालना शहर महानगरपालिकेचे लक्षात आले, त्यामुळे मागील महिनाभरापासून या जलकुंभातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. दिनांक 2 जानेवारी रोजी हे जलकुंभ भुई सपाट करण्यात आले आहे. पत्त्याची इमारत कोसळावी असे हे जलकुंभ काही क्षणातच भुई सपाट झाले आहे. आता याच ठिकाणी पुन्हा नवीन जलकुंभ जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणार आहे. दरम्यान या जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा आहेत त्या नियोजित वेळेनुसार दुसऱ्या जल कुंभावरून होणार आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version