जालना- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या प्रत्येक जिल्ह्यासाठी पाच पदांच्या जागा निघाल्या आहेत .मुलांची काळजी व संरक्षण या विभागांतर्गत प्रत्येक जिल्ह्याला एक बालकल्याण समिती अध्यक्ष आणि चार सदस्य अशा एकूण पाच पदांसाठी हे अर्ज मागविले जात आहेत. संबंधित विभागाची जाहिरात खाली दिलेली आहे. तसेच त्यामध्ये आवश्यक असणारी वेबसाईट देखील आहे. कृपया ती पहावी.

पदासाठी पात्रता आणि जबाबदारी विधी संघर्ष बालकांना त्यांचे हक्क व न्याय मिळण्यासाठी बालकल्याण समिती काम करते .अशा बालकांना पोलीस यंत्रणेमार्फत या समितीसमोर हजर केले जाते आणि या बालकांचे पुढे काय करायचे याचा निर्णय ही पाच जणांची समिती घेते. या समितीमधील सर्वच सदस्यांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणजेच न्यायाधीश पदाचा दर्जा आहे. त्यामुळे 24 तास कधीही काम करावे लागते. हे जिल्हास्तरावर कोणाच्याही कार्यकक्षेत येत नाहीत. हे पद मानधन तत्वावर आहे आणि तीन वर्षाच्या मुदतीसाठी आहे. दर दिवशी दोन हजार रुपये असे एकूण वीस दिवसांचे चाळीस हजार रुपयांचे मानधन अध्यक्ष , सदस्याला दिल्या जाते. वीस दिवसांपेक्षा जास्त काम केले तरीही मानधन वीस दिवसांचेच मिळते.

पात्रता वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत ,एम. एस. डब्ल्यू, वकील, डॉक्टर ,मनोसामाजिक तज्ञ हे या पदासाठी अर्ज करू शकतात. बालकांच्या कार्यक्षेत्रात सात वर्षांचा काम केल्याचा अनुभव असावा. पदव्युत्तर शिक्षण झालेले असावे. या काही महत्त्वाच्या अटी आहेत.(अटींची ज्याची त्याने खात्री करावी)

महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version