जालना – विविध प्रकारचे प्रकल्प हाताळायला दिल्यानंतर विद्यार्थ्यांचा विकास होतो. परंतु क्षमतेपेक्षा जास्त मोठा प्रकल्पाचे देणे योग्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे, त्यांना सहजासहजी लक्षात येणारे प्रकल्प देऊन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी लावावी .त्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांचे पालक बहीण भाऊ व्हावे लागेल, विद्यार्थ्यांमध्ये रममान व्हावे लागेल. असा सूर विद्याभारती शिक्षण संस्था देवगिरी प्रांत आणि जे.ई एस. महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020” व पायाभूत शिक्षण या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत निघाला.

या कार्यशाळेमध्ये पंचकोशीय विकास, भारतीय ज्ञान परंपरा, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, अध्ययनाचे अध्यापनशास्त्र, तसेच नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून  विवेक काढदरे, डॉ. मधुश्री सावजी, डॉ. प्रमोद कुमावत, नाना गोडबोले आणि सौ. कीर्ती देशपांडे यांनी उपस्थित शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  उद्योगपती अभय कुलकर्णी हे उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये जालना जिल्ह्यातील 100 पेक्षा अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी शिक्षकांना विद्याभारतीच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्याभारती जालना जिल्हा अध्यक्ष डॉ. पद्माकर सबनीस, सचिव श्री शार्दुल भाले, तसेच श्री विवेक कुलकर्णी, श्री चंद्रकांत दायमा,  संतोष गंडाळ,  जिजा वाघ, सौ. पद्मिनी सुरंगळीकर, सौ. अनघा देशपांडे, सौ.धनश्री सबनीस,  रामदास कुलकर्णी आणि जे.ई.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य  गणेश अग्निहोत्री यांनी  सहकार्य केले.

             

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version