जालना- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आणि नवीन संसद भावनांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभेत मांडण्याची तयारी केली आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या काळातच हा प्रस्ताव दिलेला होता .परंतु तो पूर्ण झाला नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी आमचाच फार्मूला चोरला आहे, असे असले तरी महिलांना आरक्षण मिळाले तर त्याला आमचा पाठिंबाच आहे ,अशी खोचक टीका काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172