जालना-गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची धामधूम आणि ढोल ताशे काल मध्यरात्री बंद झाले. ढोल ताशे आणि वाद्यांचा गजर जरी बंद झाला असला तरी सकाळी दहा वाजेपर्यंत मोतीबाग तलावात सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू होते. शहरातील सर्व रस्ते गुलालाने माखून निघाले होते. पुढील वर्षभरासाठी गणेशाचे विलोभनीय दृश्य, भव्य दिव्य मूर्ती, वाद्यांचे गजर, गुलालाची उधळण, हा सर्व आनंदोत्सव हृदयात आणि डोळ्यात साठवून गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. या निरोप समारंभाचे काही चित्रीकरणEdtv News च्या प्रेक्षकांसाठी.
https://whatsapp.com/chnnel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
for News&advt- DilipPohnerkar
–9422219172