जालना- एका साखर कारखान्याचे मालक असताना हजारो हातांना काम देणाऱ्या घाडगे पाटलांनी राजकारणात सक्रिय होता यावे आणि आमदारकी मिळावी म्हणून भर सभेमध्ये स्वतःला “भंगार” करून घेतले . लोकसभेमध्ये पराभव झालेल्या माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना “परीस” करून टाकले. त्यामुळे दोघेही एक दुसऱ्याच्या संपर्कात आले असते तर कदाचित “सोनं” झालं असतं पण आता तसे चित्र दिसत नाही .जालन्यात 6 ऑक्टोबर रोजी भाजपाचा सदस्यता अभियान व महा कार्यकर्ता मिळावा आयोजित केला होता. त्यामध्ये घाटगे पाटलांनी भाजपाचा उदो उदो केला होता. त्यानंतर घनसावंगी येथे झालेल्या मेळाव्यात देखील त्यांना तिकीट मिळण्याची खात्री होती परंतु या कार्यक्रमाला परीस सोडून बाकी सगळेच आले होते .त्यामुळे इथेच शंकेची पाल चुकली आणि त्यानंतर “उढाण” यांच्या शिंदे सेनेमधील प्रवेशासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली आणि मग आणखीनच चर्चेला “उधाण” आले.
कदाचित रावसाहेब दानवे यांनाही हे माहीत असावं, म्हणूनच त्यांनी घनसावंगीच्या मेळाव्याला हजेरी लावली नाही. आता झाले ही तसेच गेल्या दोन वर्षांपासून घनसावंगी मतदार संघाची जबाबदारी सतीश घाडगे यांच्यावर असताना देखील त्यांना भाजपाने तिकीट दिले नाही. त्यामुळे ते आता बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीला लागले आहेत. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आळा तरी कसा घालणार? कारण त्यांचा स्वतःचाच भावाने जालन्यातून शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. एकंदरीत काय तर या ……परीस स्पर्श होणार?
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172