जालना- महाआघाडीचे जालन्याचे उमेदवार आमदार कैलास गोरंट्याल यांनी काल 29 रोजी महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यावर आक्षेप घेतला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक असताना त्यांनी उचललेले मानधन आणि घेतलेले विविध भत्ते याचे विवरण मिळावे अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा उपनिबंधकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना तात्काळ पत्र दिले आणि माहिती उपलब्ध करून देण्यास सांगितले. परंतु ही माहिती त्यांना मिळाली नसल्याची तक्रार गोरंट्याल यांनी केली होती. यासंदर्भाच्या आक्षेपावर आज दुपारी दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी सुरू होती. परंतु कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यामुळे सायंकाळी पाच वाजता हा निकाल राखून ठेवण्यात आला. जो आता रात्री नऊ वाजता देण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत या दोन्ही उमेदवारांची धडधड वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार भास्कर दानवे यांनी “मी पुन्हा येणार” असे सांगितले आहे सविस्तर बातमी पहा व्हिडिओमध्ये.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
“या” दोन्ही नेत्यांची धडधड वाढली ; तीन तासाच्या सुनावणीनंतर निर्णय रात्री नऊ वाजता
Previous Articleदादा मी पण भंगार! म्हणणाऱ्या घाटगे पाटलांना परिस स्पर्श होणार?
EdTv
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com