जालना- बराच वेळा असं घडतं की करायला जातो एक आणि घडतं दुसरच असंच काही घडलं आहे प्रसिद्धीपासून दूर असलेल्या, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक असलेल्या आणि जालना शहरातील नामांकित महाविद्यालयांपैकी एका महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून पद भूषविलेल्या डॉ. रामलाल अग्रवाल यांच्यासोबत. त्यांच्या वडिलांची आपल्या मुलाने संस्कृत भाषेत शिक्षण घ्यावं अशी प्रामाणिक इच्छा होती त्यामुळे त्यांनी संस्कृत विद्यालय निवडले एवढेच नव्हे तर काशीचे संस्कृत शिक्षक देखील आयात केले परंतु या विद्यार्थ्याचे मन काही गुरुकुल मध्ये लागत नव्हते. शेवटी मित्रांच्या मदतीने गुजरात मधून पळ काढला रेल्वे स्थानकावर रात्रभर चिखलामध्ये बाकाखाली रात्र काढली आणि थेट घर गाठलं. त्यानंतर पुढे काय झालं हे प्रेरणादायी किस्से आणि अनेक गुपित ही डॉक्टर अग्रवाल यांच्याकडून वधु वर घेतले आहेत डॉ. शिवाजी मदन यांनी.Edtv news या ऑनलाइन न्यूज पोर्टल साठी(www.edtvjalna.com) डॉ. शिवाजी मदन यांनी सन 2005 ते 15 दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संशोधन समितीचे अध्यक्ष, फॅकल्टी कॉमर्स ऑफ सिनेट मेंबर डीन, जालना येथील व्ही. एस .एस .महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे आणि विद्यमान आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून पदभूषवत आहेत. पहा सविस्तर मुलाखत.
(प्रा.डॉ. रामलाल अग्रवाल सरांचा भ्रमणध्वनी,8275130710 ,डॉ. शिवाजी मदन सरांचा भ्रमणध्वनी,7709611111)
दरम्यान प्राचार्य पदाच्या कार्यकाळात नामांकित कॉलेजमध्ये जालना शहरातील आजी-माजी आमदारांनी शिक्षण घेतले आहे त्यावेळेस त्यांचं या महाविद्यालयात कसं वर्तन होतं याचा उलगडा देखील त्यांनी आपल्या मुलाखतीत केला आहे एवढेच नव्हे तर कुठे कुठे शिक्षण घेतलं आणि प्राचार्याच्या खुर्ची मिळण्यासाठी कोण कारणीभूत होतं याचे किस्से देखील डॉक्टर रामलाल अग्रवाल यांनी आपल्या या मुलाखतीत सांगितले . सध्या कोणत्या आंतरराष्ट्रीय पुस्तकाचे त्यांनी लिखाण केलं आहे या लिखाण करत असताना आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात या सर्व प्रवासाची आपबीती एका डॉ. अग्रवाल यांच्या तोंडून.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.