जालना- भारतीय संस्कृती पासून दूर ठेवणाऱ्या आणि फितूर करणाऱ्या विचारांना नवीन पिढीने वैज्ञानिक पातळीवर पडताळून पाहावे आणि मगच काय तो निर्णय घ्यावा! कोणाच्याही सांगण्यावर जाऊ नये .अशा फितूर करणाऱ्या विचारांपासून “दक्ष” रहावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचे प्रमुख इंदरसिंग बैस यांनी केले आहे. विजयादशमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शस्त्र पूजनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. रविवार दिनांक 29 रोजी जालन्यामध्ये हा शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी शहरांमध्ये पथसंचलनासाठी पाच वेगवेगळे विभाग केले होते. त्यामध्ये महावीर उपनगर, चंद्रशेखर आजाद उपनगर, सिद्धार्थ उपनगर ,सावरकर उपनगर आणि भगतसिंग उपनगर यांचा समावेश होता. हे पथसंचलन सायंकाळी सहा वाजता हुतात्मा जनार्दन मामा चौकामध्ये एकत्रित आले आणि त्या ठिकाणाहून शस्त्रपूजनाच्या नियोजित स्थळी रवाना झाले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय योगशिक्षक गोविंदराव हरबक आणि नगरसंगचालक नितीन अग्रवाल यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री बैस म्हणाले की ,कम्युनिस्ट आणि डाव्या आघाडीच्या लोकांना हेच पाहिजे आहे ,की भारतीय संस्कृती, परंपरा नष्ट करायचे आहे आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत त्यांच्या स्वातंत्र्याच्या नावावर खालच्या दर्जाचा विचार आणि नीचपणा स्वीकारल्या जाणार नाही. त्यांच्या या विचारांचे जर जिवंत उदाहरण पहायचे असेल तर आज रशियाचे झालेले तुकडे पाहता येतील .तसेच भारतीय संस्कृती ही सर्वांना सोबत घेऊन चालणारी संस्कृती आहे. स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार आपण करतो त्यामुळे ज्यांना इतरांनी टाकून दिले त्यांना आपलेसे करणारी आपली संस्कृती आहे. याचे देखील उदाहरण घ्यायचे असेल तर रतन टाटा यांना विचारा. ते एक पारसी आहेत .त्यांना इराकने हाकलून दिले होते .परंतु भारताने त्यांना आपलेसे केले. त्यांना या हा देश सुरक्षित वाटतोय! एवढेच नव्हे तर आज भारताचे एक मोठे उद्योगपती म्हणून ते उदयास आले आहेत .असे असताना काही विचारधारेचे लोक मुद्दामहून तरुण पिढीला दिशाभूल करण्याचे काम करत आहेत .परंतु या पिढीने कोणावरही विश्वास न ठेवता भारतीय संस्कृतीला वैज्ञानिक दृष्टिकोनावर पडताळून पाहावे. आणि मगच निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले. दरम्यान आज भारत देश अशा उंचीवर आहे जिथे भारताच्या विचारांचे इतर देश स्वागत करत आहेत. याचे देखील उदाहरण पाहायचे असेल तर नुकत्याच झालेल्या g20 चे घेता येईल .जग आतापर्यंत फक्त अर्थव्यवस्थेबद्दलच बोलत होते, जे आता माणसांच्या हिताचे बोलत आहे. हीच आपली उपलब्धी आहे. आणि भविष्यामध्ये आपली तरुण पिढी याचे नेतृत्व करणार आहे. भारताच्या सुवर्णकाळाचा पाया आपण भरला आहे. ज्या पायावर पुढील भावी पिढी “विश्वगुरू” चा सन्मान प्राप्त करणार आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172