अंबड -ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा अंबड शहरातील धाईत नगर मैदानावर दि.17 नोव्हेंबर रोजी सकाळी होत आहे. लाखोच्या संख्येने ओबीसी समाज बांधव देशभरातून या सभेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फेरीमुळे अंबड परिसरात पोलिसांनी टाईट फिल्डिंग लावली आहे.
या सभेला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार,माजी मंत्री पंकजा मुंडे,रासपचे महादेव जानकर,शब्बीर अन्सारी,आमदार गोपीचंद पडळकर आदी उपस्थित राहणार आहेतअसुन सभेच्या निमित्ताने राज्यातील ओबीसी आपली एकजूट दाखवणार आहेत. या सभेच्या बंदोबस्त संदर्भातआज दिनांक 15 रोजी औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सभेच्या ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला .
यावेळी त्यांच्या समवेत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी समन्वयक उपस्थित होते.
यावेळी डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सभेत स्थळावरील सोयी सुविधांचा आढावा घेतला त्यानंतर पोलीस बंदोबस्त विषयी माहिती देण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करून माहिती दिली.ओबीसी एल्गार सभेच्या बंदोबस्त पोलीस प्रशासन सज्ज असुन सभेला येणाऱ्या तसेच रस्त्यावर रहदारी करणाऱ्या सर्वांनी पोलीस प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक डाँ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.
शहरातील उपविभागीय पोलीस कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेला पोलीस अधिक्षक डाँ.शैलेश बलकवडे, उपविभागीय अधिकारी राहुल खांबे,पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण आदी उपस्थित होते.यावेळी डाँ.ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले,
संपुर्ण राज्यातुन ओबीसी समाज बांधव येणार असल्याने सभा सुरळीत पार पडण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताची तयारी केली आहे.
वाहन पार्किंग करतांना दिलेल्या सुचनांचे पालन करावे प्रक्षोभक घोषणाबाजी टाळावी.
असा आहे पोलीस बंदोबस्त एक पोलीस अधीक्षक तीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक सहा उपविभागीय पोलीस अधिकारी १००० पेक्षा जास्त पोलीस अंमलदार होमगार्ड राज्य राखीव पोलीस दल रॅपिड ॲक्शन फोर्स ची एक कंपनी तैनात करण्यात येणार आहे.
या आहेत मागण्या१)ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये.
२)बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जात निहाय जनगनना करण्यात यावी.३)मराठा समाजाला देण्यात आलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी.४) खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी.५ )७ सप्टेंबर २०२३ रोजी कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी शासनाने काढलेला जी. आर ताबडतोब रद्द करावा.
६ )बंजारा समाजाचा ST प्रवर्गात समावेश करुन तात्काळ ST चे दाखले वाटप करण्यात यावे.७)धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची (ST )अमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172