जालना /भोकरदन-जालना शहरातील चंदनझिरा भागातील शेळके कुटुंबातील सहा जण आज दुपारी 2.50 वाजेच्या सुमारास टाटा टियागो या चारचाकी वाहनातून (क्र. एमएम-14, जीए- 9843) भोकरदन मार्गे सिल्लोडकडे निघाले होते. सिल्लोडकडून आलेल्या डिझाएर या चारचाकी वाहनांचा (क्र. एमएच-21, व्ही-8470) आणि सिल्लोडकडे जाणाऱ्या वाहनांचा भोकरदन पासून काही अंतरावर असलेल्या राजस्थानी ढाब्याजवळ समोरासमोर भीषण अपघात झाला.
हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्हीही वाहनांच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा होऊन सिल्लोडकडून आलेल्या वाहनाचा चालक शुभम जगन्नाथ जंजाळ ,वय 29, रा. भायडी, ता. भोकरदन हा जागीच ठार झाला.तर समोरच्या वाहनातील 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये सुनील शेळके (29), लता शेळके (45), कोमल शेळके (20), अनिल शेळके (13), आकाश शेळके (28) आणि तनुश्री शेळके (9) यांचा समावेश आहे.
दुसऱ्या अपघातामध्ये भोकरदन पिंपळगाव रेणुकाई रस्त्यावरील भायडी गावाजवळ दुपारी चार वाजता चालत्या मोटरसायकल वरून पडून सौ.अश्विनी परसराम खडके राहणार वाघोली जिल्हा धाराशिव या 35 वर्षीय महिला जागीच ठार झाल्या.
दुसऱ्या घटनेत तालुक्यातील वालसावंगी येथील दिवंगत जनावरांचे वैद्यकीय अधिकारी मगर यांची पुतणी सौ. अश्विनी परसराम खडके राहणार वाघोली जिल्हा धाराशिव ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने काकाकडे काही दिवस राहण्यासाठी येत होत्या. ती धाराशिव येथून बसने भोकरदन येथे आली व येथून चार वाजेच्या सुमारास तिला घेण्यासाठी तिचा चुलत भाऊ मोटरसायकलवर आला होता त्याच्यासोबत वालसावंगी येथे जात असताना भायडी गावाजवळ रस्त्यावर खोदलेल्या चारीमध्ये मोटरसायकल आदळल्याने गाडीवरून रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाली. तिच्यासोबत एक छोटा मुलगा सुद्धा होता मात्र तो बचावला. दोन्ही प्रकरणात डॉक्टर मृदुलिनी कासोद यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172