जालना- तालुक्यातील रामनगर- मानेगाव -पाथरूड सेवली हा रस्ता गेला दोन वर्षांपासून दयनीय अवस्थेत आहे आणि या रस्त्यावर सुमारे 50 गावांचे दळणवळण अवलंबून आहे. जालना- सेवली हा रस्ता जालना शहरात येण्यासाठी कमी वेळेत आणि कमी खर्चात चांगला मार्ग आहे परंतु रस्त्याची दयनीय अवस्था असल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. ग्रामस्थांना आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध होत नाहीत, या आणि अन्य अडचणी संदर्भात परिसरातील सरपंचांनी सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाकडे वारंवार रस्त्याची मागणी केली होती. या मागणीची फलश्रुती म्हणून मागील वर्षी आपत्कालीन निधी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने 45 लाख रुपये मंजूरही केले होते. या निधीमधून सुरुवातीला काही दिवस रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम झाले आणि नंतर निधी गायब झाला आणि कामही बंद झाले. त्यामुळे संतापलेल्या काही सरपंचांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्ध नग्न आंदोलन केले. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता श्री. नागरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आजच्या या आंदोलनासाठी संतोष डेंगळे, गणेश मोहिते, मुकेश चव्हाण ,बद्री बसांडे ,गणेश डुकरे, महादेव घेंबड, विक्रम चव्हाण ,धनंजय पोहेकर, राजू कळकुंबे ,राजू पोटरे, सिद्धू आमटे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172