जालना- बांगलादेशमध्ये हिंदू आणि अल्पसंख्यांक समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आज दिनांक 16 रोजी जालन्यामध्ये भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता. जुन्याजालन्यातील गांधीचे चमन येथे गायत्री मंत्राचा जयघोष करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
आज पहिल्यांदाच उद्योजक ,व्यापारी, विविध धर्माचे संत महंत, यांची या मोर्चामध्ये उपस्थिती होती. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडावी, तिथे हिंदूंची पाडली जाणारी मंदिरे थांबवावीत, त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. त्याच सोबत स्थानिक प्रश्नाला हात घालत शहरांमध्ये भर रस्त्यावर आणि उघड्यावर मांस विक्री होत आहे ,गोमांस देखील विकल्या जात आहे याला आळा घालावा अशी मागणी देखील जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172