जालना- परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या आणि अन्य काही मागण्या संदर्भात ब्राह्मण समाजाच्या वतीने दीपक रणनवरे हे जालन्यामध्ये दिनांक 15 ऑगस्ट पासून दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे.
श्री. रणनवरे पुढे म्हणाले की ,मागच्या वेळी उपोषणाला बसलो त्यावेळेस मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु ते पूर्ण न झाल्यामुळे आता पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. उपोषणाला बसण्यापूर्वी देखील दोन महिन्यांपूर्वी शासनाला कळवले होते .परंतु काहीच फरक न पडल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे आज पर्यंत मी पाणी पीत होतो, परंतु दोन दिवसात निर्णय न झाल्यास पाणीही बंद करणार .” असेही ते म्हणाले. उपोषण मागे घ्यावे म्हणून आत्तापर्यंत प्रशासनाच्या वतीने जालन्याचे उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांनी प्रयत्न केले त्यासोबत विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी देखील दीपक रणवरे यांची भेट घेऊन मन वळविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही.
मागील उपोषणाच्या तुलनेत यावेळी उपोषणाला कमी प्रतिसाद आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना श्री. रणनवरे म्हणाले की, सध्या श्रावणाचा महिना असल्यामुळे समाज बांधव विविध सणांमध्ये, कामांमध्ये गुंतलेले आहेत . माझ्या उपोषणामध्ये राजकारणही घुसले आहे. अनेकांचे मला उपोषण मागे घेण्यासंदर्भात फोन येत आहेत, दबाव येत आहे. कारण मी उद्धव ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. एका यूट्यूब चॅनलने देखील विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्या युट्युब ने केलेल्या “एनालायझर”च्या” “राजकारणामुळे” देखील प्रतिसाद कमी मिळत असल्याचेही त्यांनी मान्य केले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172