जालना-महिको रिसर्च फाउंडेशन ट्रस्ट संचलित जालना येथे बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय आहे .या महाविद्यालयाला नॅक अ दर्जा प्राप्त आहे.असे असताना देखील महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ सुरू आहे. विद्यार्थी परीक्षा देतो, परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्णही होतो तरी देखील त्याला परीक्षेमध्ये गैरहजर दाखवून पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्यासाठी, फी भरण्यासाठी सांगितले जाते. दरम्यानच्या काळात दोन महिने या विद्यार्थ्याने कार्यालयात संपर्क साधून गुणपत्रिकेचे दुरुस्तीची करण्याची वारंवार मागणीही केली परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले आणि शेवटी आता महाविद्यालयाने या विद्यार्थ्याला परीक्षा फी भरून पुन्हा तो पेपर देण्यासाठी सांगितले आहे. दोन महिने वाया घालवल्यानंतर हा पश्चाताप या विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालकांनी महाविद्यालयात मंगळवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ठाण मांडले आणि पुन्हा बुधवारी देखील प्राचार्यांपासून सर्वांच्या भेटी घेतल्या. परंतु समाधानकारक उत्तर तर मिळालेच नाही उलट महाविद्यालयाने ह्या चुकीचे खापर विद्यापीठाच्या माथी फोडले आहे. या सर्व प्रकारामुळे पालक मात्र संतप्त झाले असून विद्यार्थिनीचे जर वर्ष वाया गेले तर आपल्या जीवाचे बरे वाईट करण्याचे हे बोलून दाखवले आहे. सविस्तर बातमी पहा खालील व्हिडिओमध्ये.



ब्रॉडकास्ट लिस्ट आणि व्हाट्सअप ग्रुप ची मर्यादा संपली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे लिंक येईलच याची खात्री नाही. कृपया वाचकांनी खालील दिलेल्या व्हाट्सअप चैनल च्या लिंक ला ॲड व्हावे ही विनंती.
Edtv News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
Follow You tube https://youtube.com/@edtvjalna5167?si=U3z9PKDBIQ4vPTAk
Web-www.Edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172
