माऊलींच्या वारी मधून- महाराष्ट्राच्याच नव्हे तर इतर राज्यांच्या कानाकोपऱ्यामधून पंढरपूरकडे निघालेले वारकरी आता पंढरीच्या जवळ आलेले आहेत .एवढा प्रवास केल्यानंतर थकवा न जाणवता विठुरायाची भेट होईल, विठुराया दिसेल या आनंदाने त्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले आहेत. वारकरी वर्षभर याच दिवसाची वाट पाहतो आणि विठुरायाला भरभरून पाहून परत आपल्या घरी परततो .तो दिवस आता जवळ येऊन ठेपला आहे .
खरंतर अनेक जण मोबाईलवर, टीव्हीवर या वारीमधील आनंदोत्सव पाहतात ,अनेकांना कौतुक वाटतं कुतूहल वाटतं हे सर्व चालतं कसं? पण माऊली! जोपर्यंत तुम्ही वारीमध्ये येत नाहीत तोपर्यंत हे कोडं तुम्हाला न उघडणार आहे. अशाच या वारीसोबत पायी चालत वारी जाणून घेण्याचाEDTV चा हा प्रयत्न.
अधिक बातम्या पहाण्यासाठी https://edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172