जालना- जालना जिल्हा आता सरळ सोपा जिल्हा राहिला नाही तर तो एक अति संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखायला लागला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या केंद्रीय राखीव दलाच्या रॅपिड ऍक्शन फोर्स, म्हणजेच दंगा नियंत्रण पथकाने ने जालना शहरातून आज पथसंचलन केलं.
केंद्रीय राखीव दलाचे हे पथक महाराष्ट्र पोलीस यांनी ठरवून दिलेल्या शहरांमध्ये आठ ते दहा दिवस ठाण मांडून बसत आणि जिल्ह्यांमध्ये संवेदनशील असलेल्या पोलीस ठाण्यांतर्गत पथसंचलन करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं. हे करत असतानाच त्याचा दुसरा अर्थ असाही निघतो की गुन्हेगारांनो दंगेखोरांनो सावधान व्हा! तुमच्यासोबत दोन हात करायला आम्हीही तयार आहोत आणि तुम्हाला कसं काबूमध्ये करायचं हे आम्हाला देखील ठाऊक आहे. कदाचित त्याची पूर्वतयारी म्हणूनच शहरातील संवेदनशील भागांमधून हे पथसंंचलन केल्या जातं. शहरांमध्ये सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज हे पथसंचलन झालं. मामा चौक, फुलबाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंगळ बाजार ,पाणी वेस या मार्गे शोभा प्रकाश मंगल कार्यालयात याचा समारोप झाला.
केंद्रीय राखीव दलाच्या आर. ए .एफ. म्हणजेच रॅपिड ऍक्शन फोर्स च्या 102 बटालियनचे जवान जालन्यात आले आहेत. त्यांचे अधिकारी म्हणून द्वितीय कमान अधिकारी प्रेम कुमार ,सहाय्यक कमांडंट श्रीमती नेहा यादव, निरीक्षक रवि कांत ,श्रीमती प्रीती सिंह यांच्यासह आठ महिला आणि 70 जवान आहेत. यापूर्वी 2021 मध्ये हे पथक जालन्यात येऊन पाहणी करून गेले होतो. पथसंचलनामुळे भविष्यामध्ये जर दंगा झाला तर याच पथकाला दंग्याच्या ठिकाणी पाठवल्या जातं, कारण या पथकाने संवेदनशील भागात फिरून त्या भागाचा अभ्यास केलेला असतो. दिनांक आठ ऑगस्ट पर्यंत हे पथक जालना जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या 10 पोलीस ठाणे अंतर्गत पथसंचलन करणार आहे. या केंद्रीय पथकासोबत स्थानिक पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन ,कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री माने पोलीस निरीक्षक श्री शिंदे आदींचा सहभाग होता.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172