जालना- पावसाळ्याला सुरुवात झाली की महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचे नमुने पाहायला मिळतात। मग अनेक वेळा अशा दुर्घटना घडतात की ज्यामधून नुकसान भरून येणे कधीही शक्य नाही. यातूनच काल या गलथान कारभारामुळे तीन गाईंना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या संदर्भात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षकांना पत्र देऊन उर्वरित डीपी व्यवस्थितपणे बंद करून घ्याव्यात अन्यथा अशा घटना घडल्यास वीज कंपनीला जबाबदार धरण्यात येईल असा सक्त इशारा दिला आहे.
वर्षभर देखभाल दुरुस्ती न करणाऱ्या वीज वितरण कंपनी पावसाळ्यात देखील थातूरमातूर दुरुस्ती करते. याच दुरुस्तीचा परिणाम अनेक विजेच्या खांबांमध्ये विद्युत प्रवाह उतरणे. एखाद्या घराला जर तार खेटून गेली असेल तर त्या घरात विद्युत प्रवाह उतरणे .असे अनेक प्रकार घडतात. दरवर्षी मुक्या जनावरांसोबत मनुष्य प्राणी देखील आपला जीव गमावून बसतात. अशाच तीन दुर्घटना काल दि. गुरुवार दिनांक 12 रोजी घडल्या. त्यामध्ये रामनगर परिसरात असलेल्या बालाजी गल्ली, मोदीखाना आणि बडी सडक या तीनही ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या डीपी आहेत. या डीपीला कु संरक्षण कुंपण नसल्यामुळे पाऊस पडला की जनावरे या डीपीचा सहारा घेतात त्याच वेळी या खांबांमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का बसून जनावरांचा मृत्यू झाला आहे.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
*दिलीप पोहनेरकर *
९४२२२१९१७२