जालना- केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची सध्या धडक मोहीम सुरू आहे .याचाच एक भाग म्हणून दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले, आणि त्यानुसार त्यांना आवश्यक असलेल्या उपकरणांचे मोजमाप घेण्यासाठी बुधवार दिनांक 21 रोजी एका शिबिराचे जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये उद्घाटनाचा तर मोठा थाट झाला, परंतु ज्या दिव्यांगांसाठी हे शिबिर आहे त्यांची पुरती वाट लागली. त्यांना न बसायला खुर्ची मिळाली न प्यायला पाणी.
निवडणुका तोंडावर यायला लागले आहेत आणि सरकारने विविध योजनांचा आढावा घेण्याचा सपाटा सुरू केला आहे त्या अनुषंगाने शासनाने जनतेसाठी केलेल्या योजनांचा आढावा घेणे सुरू केले आहे त्यामुळे प्रशासन आता शासन आपल्या दारी असे म्हणत घरोघरी फिरत आहे एवढेच नव्हे तर या दिव्यांगांच्या झालेल्या सर्वेनुसार त्यांना घरपोच प्रमाणपत्र ही देण्यात आली आणि सन्मानाने त्यांना आवश्यक असलेल्या उपकरणांचे मोजमाप घेण्यासाठी बुधवार दिनांक 21 रोजी या शिबिरामध्ये बोलावण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या उपस्थितीत झाले उद्घाटन तर थाटात झाले परंतु नियोजना अभावी या दिव्यांगांचे अतोनात हाल झाले तपासणीसाठी डॉक्टर नाहीत बसण्यासाठी खुर्च्या नाहीत पिण्यासाठी पाणी नाही 50 60 किलोमीटरवर आलेल्या दिव्यांगांना पोटभर अन्नही नाही अशा परिस्थितीत दिव्यांगांनी शासनाला धन्यवाद देण्यापेक्षा खाली मुंडकं वर पाय करण्याची भाषा वापरली त्यामुळे शासन आपल्या दारी ही योजना कशा पद्धतीने साकारल्या जात आहे याची झलक पाहायला मिळाली. विशेष म्हणजे दिनांक 25 जून रोजी शासनाच्या या योजनांचा आढावा घेण्यासाठी जालन्यामध्ये येत आहेत आणि त्यांच्यापुढे शासनाने केलेल्या कामाचा आढावा मांडण्याचा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जो अर्थ घ्यायचा तो घ्यावा परंतु सामान्य जनतेने देखील वरच्या व्हिडिओतून नेमक्या या योजना कशा “सफल” होत आहेत याचा अंदाज बांधायला हरकत नाही.
अधिक माहितीसाठी डाऊनलोड करा,
App on play store- edtv jalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर ,942221972