जालना- जुना जालना भागासाठी पैठण येथील नाथसागरामधून पाणीपुरवठा केला जातो तर नवीन जालना भागासाठी घाणेवाडी येथे असलेल्या संत गाडगेबाबा जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान जुना जालना भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आज पुन्हा दुपारी अडीच वाजता रेल्वे स्थानक ते मस्तगड दरम्यान फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी “पाण्यात” गेले असून जालनेकरांना पुन्हा जल संकटाचा सामना करावा लागणार आहे.
आंबडहून येणारे पाणी जुना जालना भागात असलेल्या विविध जल कुंभांमध्ये साठविले जाते. त्यानुसार रेल्वे स्थानकाकडून मस्तगड कडे जात असलेली जलवाहिनी मागील आठवड्यात रेल्वे स्थानकात स्थानक परिसरात फुटली होती . तिला दुरुस्तीसाठी 4 दिवस गेले होते. तीच जलवाहिनी पुढे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निरामय हॉस्पिटलच्या जवळ फुटली आहे. त्यामुळे पुन्हा लाखो लिटर पाणी वाया जात आहे. माहिती मिळाल्यानंतर या जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला तरी जलवाहिनी मध्ये साठलेले पाणी वाहून जाण्यासाठी किमान दोन तास लागतात तोपर्यंत कुठलीही हालचाल करता येत नाही ,आणि हे पाणी बंद झाल्यानंतर दुरुस्ती सुरू केल्या जाते. त्यामध्ये आज रविवार पर्यायाने ही जलवाहिनी रिकामी झाल्यानंतर उद्या या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होईल आणि दोन दिवस हे काम चालल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा जल कुंभ भरण्यास सुरुवात होईल .म्हणजे किमान चार दिवस तरी या जलवाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे .उन्हाळ्याला अजून सुरुवात व्हायची आहे आणि त्यापूर्वीच जलवाहिन्या फुटत असल्यामुळे जालनेकारांवर पाणी संकट येणार ही धोक्याची घंटी वाजत आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172