जालना- जालना तालुक्यातील रेवगाव हे असे एक गाव आहे की जिथे संत प्रेमानंद बाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था चालते. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे इथे कीर्तनकारांना ह. भ .प. विष्णू महाराज बारड हे घडवतात .परंतु त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत ते गावकरी आणि त्यांची पत्नी यशोदा! गावकरी यासाठी की आजही या संस्थेतील विद्यार्थी रोज सकाळ- संध्याकाळ गावामध्ये माधुकरी मागून आपली उपजीविका चालवतात .आळीपाळीने तीन विद्यार्थी सकाळी आणि तीन विद्यार्थी संध्याकाळी गावांमध्ये जाऊन माधुकरी मागतात आणि आलेली शिदोरी या संस्थेच्या इमारतीमध्ये बसून प्रेमानंद बाबांचा प्रसाद समजून आपली उपजीविका चालवतात . यांचा सांभाळ करते ती “यशोदा”, यशोदा म्हणजे विष्णु महाराज बारड यांची पत्नी .फक्त सांभाळच करत नाही तर त्यांना वेगवेगळे अध्यात्मिक धडे देखील त्या देतात .त्यामुळे खऱ्या अर्थाने संस्काराचे धडे कोण देत असेल तर त्या यशोदा आहेत! आणि उपजीविका चालवणारे गावकरी आहेत .गावात सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर पहिला घास,पहिली भाकरी,पोळी माधुकरीसाठी वेगळी काढून ठेवल्या जाते,कारण त्यांची अशी भावना आहे की हा नैवेद्य देवापर्यंत पोहोचतो. सौ यशोदा यांचे लग्न मामाच्या मुलासोबत झाले आहे. विशेष म्हणजे लहानपणापासून कीर्तनाचे घडे गिरवण्यासाठी आळंदी येथे राहणाऱ्या विष्णूला यशोदेने पाहिलं ते थेट लग्नातच !दरम्यानच्या काळात फक्त बोलणे होत होते आणि महाराजांनी एकच विचारलं मी कीर्तनकार आहे त्यामुळे पॅन्ट घालणार नाही ,धोतर घातलेला नवरा चालेल का आणि यशोदानही तेवढ्याच तत्परतेने उत्तर दिलं हो मला धोतर घालणारच नवरा पाहिजे आणि मग काय झालं शुभमंगल .आज या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पन्नास विद्यार्थी निवासी पद्धतीने कीर्तनाचे धडे गिरवत आहे. कसे गिरवतातधडे? कसे माधुकरी मागतात? कसे राहतात? याविषयी सविस्तर माहिती पहा व्हिडिओमध्ये.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172